पुणे येथील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 38 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आसल्याचे जाहीर केले. मात्र जो पूल कोसळला तो पूल 1992 साली बंधण्यात आला होता. या पुलाचे पावसाळापूर्वी ऑडिट का करण्यात नव्हते आले? पूल इतका जुना असताना सरकारचे याकडे लक्ष का गेले नाही? दरवेळी अशी घटना घडल्यानंतर पैसे देऊन गेलेला माणूस परत येणार आहे का? असे सवाल उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.