नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना, दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंत्र्यांच्या तात्पुरत्या निवासस्थानांवर होणारा हा खर्च अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करत आहे. या पार्श्वभूमीवर, 'शेतकरी अडचणीत असताना केवळ अधिवेशन काळापुरत्या राहणाऱ्या बंगल्यांवर कोट्यवधींचा खर्च कशाला?' असा संतप्त सवाल सामान्य जनतेकडून आणि विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. अधिवेशनाच्या काळात केवळ काही दिवसांच्या वास्तव्यासाठी एवढा मोठा खर्च होत असल्याने सरकारच्या प्राधान्यक्रमावर आणि संवेदनशीलतेवर टीका होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.