राज्यात गेल्या चार महिन्यात अति मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. नद्या-नाल्यांना पूर आल्यामुळे संसार पाण्यात गेले. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. सरकारकडून तात्काळ मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. शेतामधील पिकांची नुकसान भरपाई मिळणार आहेच. त्याशिवाय जनावरे वाहून गेल्यामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान झाली आहे. त्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत केली जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
सध्या पहिल्या टप्प्यात ३१ लाख शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. पोस्टमार्टमशिवाय जनावरांची मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याशिवाय पूरग्रस्तांना सर्वोत्परी मदत केली जाणार आहे. घर, शेती, जनावरे याबाबत नुकसान भरपाई दिली जाईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याच्या सूचना दिल्यात...'सर्व मंत्र्यांनी ग्राऊंडवर काम करा अशा सूचनाही फडणवीसांनी केल्याची माहिती आहे...मराठवाड्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय.....मुसळधार पावासमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.