आज बीडमध्ये ओबीसी एल्गार सभा पार पडली. या सभेमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यासह त्यांच्याच मंत्रीमंडळातील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला. विखे पाटील कारण नसताना जरांगेकडे जातात. भाजपच्या लोकांना मला सांगायचे आहे की तुमच्या लोकांना आवारा असे आक्रमकपणे भुजबळ म्हणाले. पुढे भुजबळ म्हणाले, मराठा समाज आणि आमच्यात अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरींदर पाटलामुळे पडले असे म्हणत छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील जोरदार टीकास्त्र सोडले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.