Chandrashekhar Bawankule questions MVA Satyacha Morcha over EVM allegations : महाविकास आघाडीने ईव्हीएम आणि सदोष मतदारयाद्यांविरोधात काढलेल्या 'सत्याचा न्याय मोर्चा'वर भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'हा मोर्चा म्हणजे महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण तयार करण्याकरिता आहे,' असा थेट हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीत याच ईव्हीएमवर ३१ खासदार निवडून आले, मग तेव्हा मतचोरी झाली होती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा मोर्चा म्हणजे लोकसभेप्रमाणेच निवडणुकीपूर्वी एक खोटं नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महानगरपालिकेत काहीही फरक पडणार नाही आणि महायुती ५१ टक्के मतं मिळवून जिंकेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.