रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापही सुटलेला नसताना यंदा देखील रायगडचे ध्वजारोहण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिन्याने राज्यातील जिल्हयाचे पालकमंत्री जाहीर झाले.
रायगडचे पालकमंत्रीपद हे अदिती तटकरे यांना दिले होते तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नेमणूक करण्यात आली होती. यानंतर अवघ्या काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा केलाय, तर दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. यामुळे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव देखील आहे. या सगळ्यातच आज पुन्हा भरत गोगावले यांना पुन्हा झटका बसला असून 15 ऑगस्टला रायगड येथील झेंडावंदन हे अदिती तटकरे यांच्या हस्तेच होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये वाद होण्याची चिन्हे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.