बीड: छेडखानी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीड मधील के एस के महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. साक्षी कांबळे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. अभिषेक कदम असं या नराधम आरोपीचे नाव आहे. आजच्या दिवशी म्हणजे 20 एप्रिल रोजी या मुलीचं लग्न ठरलं होतं. अभिषेक कदम हा वारंवार ब्लॅकमेल करत होता. आणि याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून साक्षीने धाराशिव येथील मामाच्या घरी गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली.
घटनेला एक महिना पूर्ण होतोय तरी देखील न्याय मिळत नाही. त्यामुळे साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. धाराशिव पोलिसांनी काहीच सहकार्य केले नाही असा आरोप साक्षीची आई कोयना विटेकर यांनी केली आहे. माझ्या मुली सोबत जे घडलं ते इतर मुली सोबत घडू नये त्यासाठी यातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील पीडित कुटुंबाने केली आहे. दरम्यान धाराशिव पोलिसांनी आरोपी अभिषेक कदम याला अटक केली होती. मात्र काही दिवसातच त्याची जामीनावर देखील सुटका झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.