शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या 6 दिवसांपासून बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करत असून आपल्या आंदोलनावर ते ठाम आहेत. दरम्यान अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्च कडू यांची भेट घेतलीये. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंशी फोनद्वारे चर्चा केली.
पण मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली ती काही प्रमाणात प्रश्न निर्माण करणारी आहे, कर्जमाफी संदर्भात समिती गठन करून तिचा अहवाल आल्यावर आम्ही कर्जमाफी करू असं त्यांनी सांगितलं, पण ते कधी करणार? हा प्रश्न आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. देशावर अहमदाबादच्या घटनेने झालेल्या आघातानंतर या काळात बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावं. ते आमचं म्हणणं ऐकतील. देशातील परिस्थिती पाहता बच्चू कडू यांनी आंदोलन मागं घ्यावं असे आवाहन मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी बच्चू कडू यांना केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.