आशिया कपातील भारत - पाक सामना सध्या चांगलाच चर्चत आहे. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण करताना केलेल्या बंदुकीच्या गोळीबारासारख्या सेलिब्रेशनवरून वाद निर्माण झाला आहे. या घटनेवर ठाकरे सेना खासदार संजय राऊत यांनी बीसीसीआय आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे. पाकड्यांनी निरपराध पर्यटकांना असे मारले हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता.बीसीसीआय व केंद्र सरकारसाठी हे लज्जास्पद आहे". असे राऊत यांनी म्हटले आहे. या विधानांमुळे राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात जोरदार चर्चेला उधाण आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.