धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं चालतं त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागेल. बीड प्रकरणात सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोप आहे आमचा. वाल्मिक कराड यांचा या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग आहे. त्यामुळे त्यांना पाठीशी घातले जात आहे, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेत अनेक जण आले आणि गेले. शिवसेना तळपत राहिले आहे. त्यामुळे कोणी आले गेले यांनी फरक पडत नाही. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. चांगल्या कामासाठी मुख्यमंत्र्यांना मदत करणे सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यांना जनतेची साथ लागते, पवार साहेबांची भूमिका असेल तर ती सगळ्याची भूमिका असेल. विरोधी पक्षाने नेहमी टीका करावी अस नाही. विरोधक दिसत नाही अस नाही बीड प्रकरणात सगळ्या आधी विरोधक यांनी भूमिका माडली. विरोध पक्ष सगळ्या प्रश्नावर बोलत आहेत. बीड प्रकरणात सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोप आहे आमचा. वाल्मीक कराड यांचा या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग आहे. त्यामुळे त्यांना पाठीशी घातले जात आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पान पुसणार आहे. अनेक योजना बाबत सरकार आश्वासन दिले आहेत.ते पूर्ण करेल की नाही माहिती नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.