मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादीत मोठा घोळ असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाचा आकडा ११ लाख होता, जो आम्हाला आकडा सापडला तो साधारणपणे १४ लाख आहे असा दावा ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला. १ जुलै २०२५ नंतर यादीत ३२ ते ३३ हजार नवीन मतदार समाविष्ट झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मृत मतदारांची नावे आणि एकाच व्यक्तीचे नाव अनेकदा आल्याचे पुरावे त्यांनी मांडले. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत सिनेट सदस्य परम यादव आणि मिलिंद साटम उपस्थित होते. निवडणूक आयोग आणि बीएमसी प्रशासनावर त्यांनी सडकून टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.