धरमशालेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १ डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिका ४-१ ने जिंकली आहे. दरम्यान या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळाला आहे. या सामन्यानंतर कशी आहे गुणतालिकेची स्थिती? जाणून घ्या.
भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत ९ सामने खेळले आहेत. यादरम्यान ६ सामने जिंकले आहेत. तर २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि एक सामना ड्रॉ राहिला आहे. गुणतालिकेत भारतीय संघाचे एकूण ७४ अंक असून विजयाची सरासरी ६८.५१ टक्के इतकी आहे. भारतीय संघ या यादीत अव्वल स्थानी कायम आहे."
भारत - इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत केलं. या दमदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने गुणतालिकेतील स्थिती आणखी मजबूत केली आहे. त्यामुळे भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ स्पर्धेतील फायनलमध्ये जाण्याचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या स्थानी टिकून राहण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. (Cricket news in marathi)
न्यूझीलंडच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंडने ५ सामने खेळले असून ३ जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. न्यूझीलंडचा संघ ३६ गुण आणि ६० टक्के विजयाच्या सरासरीसह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. तर ३ सामने गमावले असून १ सामना ड्रॉ राहिला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ दुसऱ्या स्थानी कब्जा करेल .
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.