
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यातील पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी ३४० आव्हान ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या १५५ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. मात्र इतर कुठल्याही फलंदाजाकडून त्याला हवी तशी साथ मिळाली नाही. दरम्यान हा सामना गमावल्यानंतर काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा? जाणून घ्या.
सामन्यानंतर बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ' हे खूप निराशाजनक आहे. आम्हाला शेवटपर्यंत लढायचं होतं. पण दुर्देवाने असं होऊ शकलं नाही. संपूर्ण कसोटी सामन्यात आम्हाला संधी मिळाल्या पण, आम्हाला त्या संधीचा फायदा घेता आला नाही. आम्ही हवा तसा खेळ करु शकलो नाही. '
तसेच तो पुढे म्हणाला, ' चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर मी माझ्या रुममध्ये गेलो आणि विचार केला की एक कर्णधार म्हणून आम्ही काय करु शकतो. आम्ही सर्वकाही केलं, पण त्यांनी शेवटच्या विकेटसाठी केलेली भागीदारी आम्हाला महागात पडली. आम्हाला माहित होतं की, ३४० धावांचा पाठलाग करणं मुळीच सोपं नसेल. आम्हाला चांगली सुरुवात करुन शेवटच्या २ सत्रांसाठी विकेट शिल्लक ठेवायच्या होत्या. पण त्यांनी शानदार गोलंदाजी केली. '
यासह रोहितने जसप्रीत बुमराहचेही कौतुक केले, तो म्हणाला,' तो अप्रतिम आहे. आम्ही त्याला गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय. इथे येऊन त्याने आपलं काम पूर्ण केलंय. तो आकडेवारी पाहत नाही. त्याला देशासाठी खेळायचं आहे. त्याला देशासाठी चांगली कामगिरी करायची आहे. हीच त्याची भूमिका आहे. '
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना, यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने ३० धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.