
IPL 2025 मध्ये एका इनिंग्समध्ये ३०० धावसंख्या पाहायला मिळेल असे बरेचसे लोक म्हणत होते. मागच्या वर्षीचा सनरायजर्स हैदराबादची कामगिरी पाहून ते यंदाच्या सीझनमध्ये सहज ३०० धावा करतील असा अंदाज वर्तवला होता. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात हैदराबादने २८६ धावा केल्या. त्यानंतर हैदराबादने निराशा केली. सध्या केकेआरचा स्टार खेळाडू रिंकू सिंहने ३०० धावांबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ मध्ये ट्रॉफी मिळवली होती. पण या सीझनमध्ये केकेआरने सूर गमावल्याचे पाहायला मिळत आहे. एकूण ८ सामन्यांपैकी फक्त ३ सामन्यांमध्ये केकेआरचा विजय झाला आहे. तर ५ सामने त्यांनी गमवाले आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा संघ संघर्ष करत आहे. पण तरीही रिंकू सिंहने आम्ही ३०० धावसंख्या पार करण्याचा दावा केला आहे.
जिओहॉटस्टारशी रिंकूने संवाद साधला. तो म्हणाला, आयपीएलमध्ये आम्ही सध्या अशा परिस्थितीमध्ये आहोत, जेथे अशा गोष्टी शक्य आहेत. होय, आम्ही नक्कीच करु शकतो. ३०० धावा करणे शक्य आहे. गेल्या वर्षी पंजाबने २६२ धावांचा पाठलाग केला होता. या वर्षी प्रत्येक संघ खूप मजबूत आहे आणि कोणीही ३०० चा टप्पा गाठू शकतो.
गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना रिंकू सिंहने यश दयालने शेवटच्या ५ चेंडूंवर ५ षटकार ठोकले होते. त्यानंतर रिंकू सिंहची प्रसिद्धी वाढत गेली. या सीझनमध्ये रिंकू चमकदार कामगिरी करु शकला नाहीये. त्याने ३३.२५ च्या सरासरीने ८ सामन्यांमध्ये १३३ धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेट १४६.१५ इतका आहे. रिंकू परत जुन्या फॉर्ममध्ये येईल असे चाहते म्हणत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.