रोहित शर्मा आणि शुभमन गिलची अर्धशतकी खेळी, केएल राहुल, विराट कोहलीचा शतकी तडाखा आणि कुलदीप यादवनं फिरकीवर नाचवत घेतलेल्या ५ विकेट्समुळं भारतानं पाकिस्तानवर आजवरचा सर्वात मोठा विजय मिळवला.
आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील हायव्होल्टेज सामन्यात भारतानं पाकिस्तानवर २२९ धावांनी विजय मिळवला. विराट कोहली, केएल राहुल आणि कुलदीप यादव हे या सामन्याच्या विजयाचे शिल्पकार ठरले. (Latest Marathi News)
टीम इंडियाने सुपर-४ स्टेजमध्ये पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर २२८ धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला ५० षटकात २ गडी गमावून ३५६ धावांचं आव्हान दिलं होतं.
टीम इंडियाने दिलेल्या धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. पाकिस्तानचे इमाम-उल-हक आणि कर्णधार बाबर आझम स्वस्तात माघारी परतले. इमाम हा ९ धावांवर बाद झाला तर बाबर हा १० धावांवर बाद झाला. यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता.
पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला. पावसामुळे सामना तब्बल १ तास थांबवण्यात आला होता. सामना सुरु झाल्यावर पाकिस्तानची पडझड सुरूच राहिली. शार्दुलने पहिल्याच षटकात मोहम्मद रिझवानला बाद केले.
त्यानंतर कुलदीप यादवने फखर जमान, सलमान अली आगा , शादाब खान ,इफ्तिखार अहमद आणि फहीम अशरफला बाद केले. कुलदीप यादवने या सामन्यात तब्बल पाच गडी बाद केले.
तत्पूर्वी, या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी खेळली. विराट कोलहीने नाबाद १२२ धावा कुटल्या तर केएल राहुलने १११ धावा कुटल्या. तर रोहित शर्मा आणि शुबमन शर्मा यांनी अर्धशतक ठोकलं. टीम इंडियाने ५० षटकात २ गडी गमावून ३५६ धावा कुटल्या होत्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.