

टी-२० वर्ल्डकप २०२६ चा आज शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिययमध्ये या स्पर्धेची फायनल रंगणार आहे. भारत विरूद्ध न्यूझीलंड या दोन्ही टीम्स वर्ल्डकपच्या ट्रॉफीसाठी आमने-सामने येणार आहे.
एकीकडे टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर न्यूझीलंड त्यांचा पहिला टी-२० वर्ल्डकप उचलण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. आजच्या या सामन्यात कोणत्या टीमचं पारडं जड आहे ते पाहूयात.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत एकूण ३० टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये वर्ल्डकपच्या सामन्यांचा देखील समावेश आहे. जर आपण दोन्ही संघांमधील ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा निकाल पाहिला तर त्यामध्ये टीम इंडिया वरचढ दिसून येते. तर टी-२० वर्ल्डकपचे सामने पाहिले तर न्यूझीलंडचं पारडं यावेळी जड दिसतंय.
एकंदरीत पाहिल्यास ३० सामन्यांमध्ये भारताने एकूण १६ सामने जिंकलेत. तर न्यूझीलंडच्या टीमने ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ३ सामने टाय झालेत. आतापर्यंत दोन्ही टीम टी-२० वर्ल्डकपमध्ये ३ वेळा एकमेकांसमोर आल्या आहेत. मुख्य म्हणजे या तिन्ही वेळा न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.
२००७, २०१६ आणि २०२१ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाला होता. न्यूझीलंडने २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये १० रन्सने, २०१६ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये ४७ रन्सने आणि २०२१ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये ८ विकेट्स राखून भारताचा पराभव केला.
२०२६ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना भारताच्या मैदानावर रंगणार आहे. अशावेळी दोन्ही संघ भारतीय भूमीवर १६ टी-२० सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारताने ११ वेळा सामने जिंकलेत तर न्यूझीलंडने ५ वेळा विजय मिळवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.