
जिथे विषय हार्ड असतो तिथे विराट खंबीरपणे उभा असतो. हे एकदा नाहीतर अनेकदा पाहायला मिळालं आहे. असंव काहीसं चित्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यादरम्यान पाहायला मिळालं.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव २४१ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना विराटच्या शानदार शतकी आणि श्रेयस अय्यरच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून ४१ धावांची भागीदारी केली, यादरम्यान रोहितला २० धावा करता आल्या. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने मिळून अर्धशतकी भागीदारी केली. गेल्या सामन्यातील शतकवीर गिलने ५२ चेंडूंचा सामना करत ४६ धावा केल्या.
एका बाजूने विकेट्स जात होत्या, तर दुसऱ्या बाजूने विराट कोहलीने एक बाजू धरुन ठेवली होती. गिसोबत अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर, विराटने गिलसोबत मिळून मोर्चा सांभाळला. दोघांनी मिळून १०० हून अधिक धावा जोडल्या.
ही जोडी नाबाद राहून पाकिस्तानला हरवणार की काय, असं वाटू लागलं होतं. मात्र श्रेयस अय्यर ६७ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी करत माघारी परतला. दोघांनी मिळून भारतीय संघाला विजयाची वाट दाखवली. शेवटी विराटने भारतीय संघाच्या विजयाचा कळस चढवला. विराटने या सामन्यात फलंदाजी करताना १०० धावांची खेळी केली.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सौद शकीलने ६२ धावांची खेळी केली. तर मोहम्मद रिझवानने ४६ धावांची खेळी केली. तर खुशदील शाहने ३८ धावांची खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानचा डाव अवघ्या २४१ धावांवर आटोपला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.