
Ind Vs Eng कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये २३ जुलै रोजी सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी हा दुखापतग्रस्त झाला आहे. दुखापतीमुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. रविवारी (२० जुलै) जिम सेशनदरम्यान नितीशच्या गुडघ्याला दुखापत झाली. नितीश कुमार रेड्डी लवकरच मायदेशी परतेल अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
नितीश कुमार रेड्डी व्यतिरिक्त रिषभ पंत, अर्शदीप सिंह आणि आकाश दीप असे भारतीय संघातील चार खेळाडू दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान रिषभ पंतच्या बोटाला दुखापत झाली. याचा परिणाम त्याच्या खेळावर झाल्याचे पाहायला मिळाले. या कसोटीत आकाश दीपला पाठ, कंबरेचा त्रास व्हायला सुरुवात झाली. दुखापतीमुळे तो चौथा कसोटीतून बाहेर पडल्याचे म्हटले जात आहे.
जसप्रीत बुमराहच्या जागी चौथ्या कसोटीमध्ये अर्शदीप सिंहला खेळवण्याचा टीम इंडियाचा प्लान होता. पण सरावसत्रादरम्यान अर्शदीपच्या डाव्या हाताला दुखापत झाली. आता काल (२० जुलै) जिममध्ये सराव करताना नितीश कुमार रेड्डीच्या गुडघ्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे तो पुढील दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहभागी होणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये सध्या भारत १-२ ने पिछाडीवर आहे. भारताने एजबॅस्टनमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. पण लीड्स आणि लॉर्ड्स या दोन्ही ठिकाणी भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मालिकेमध्ये टिकून राहण्यासाठी मँचेस्टर कसोटी जिंकणे भारतासाठी आवश्यक आहे. पण सामन्यापूर्वी संघातील खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्याने टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.