IND vs BAN 3rd T20: टीम इंडियाने विजयाचं सोनं लुटलं! रेकॉर्ड ब्रेकिंग विजयासह बांगलादेशचा सुपडा साफ

India vs Bangladesh: भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात सामन्यात शानदार विजय मिळवला आहे.
IND vs BAN 3rd T20: टीम इंडियाने विजयाचं सोनं लुटलं! रेकॉर्ड ब्रेकिंग विजयासह बांगलादेशचा सुपडा साफ
team indiatwitter
Published On

India vs Bangladesh 3rd T20I: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना पार पडला. युवा खेळाडूंची भरमार असलेल्या भारतीय संघने बांगलादेशचा सुपडा साफ केला.

यापूर्वी झालेल्या कसोटी मालिकेतही भारतीय संघाने बांगलादेशला २-० ने धूळ चारली होती. आता भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी २९८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला १६४ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने हा सामना १३३ धावांनी आपल्या नावावर केला आहे.

भारताने उभारला २९७ धावांचा डोंगर

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या संजू सॅमसनने ४७ चेंडूंचा सामना करत १११ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४७ चेंडूचा सामना करत १११ धावांची खेळी केली.

IND vs BAN 3rd T20: टीम इंडियाने विजयाचं सोनं लुटलं! रेकॉर्ड ब्रेकिंग विजयासह बांगलादेशचा सुपडा साफ
IND vs BAN: दसऱ्याला टीम इंडियानं लुटलं धावांचं सोनं; बांगलादेशच्या गोलंदाजांना धुतलं, षटकार-चौकारांचा पाऊस

या खेळीदरम्यान ११ चौकार आणि ८ षटकार खेचले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूंचा सामना करत ७५ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने ५ षटकार आणि ८ चौकार खेचले. या दोघांनी मिळून बांगलादेशच्या गोलंदाजांना धू धू धुतलं. शेवटी रियान परागने १३ चेंडूत ३४ धावा चोपल्या. तर हार्दिक पंड्याने १८ चेंडूत ४७ धावा करत भारतीय संघाची धावसंख्या ६ गडी बाद २९७ धावांवर पोहोचवली.

IND vs BAN 3rd T20: टीम इंडियाने विजयाचं सोनं लुटलं! रेकॉर्ड ब्रेकिंग विजयासह बांगलादेशचा सुपडा साफ
IND vs BAN 3rd T20I: भारत- बांगलादेश सामना रद्द होणार? समोर आलं टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारं कारण

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी २९८ धावांची गरज होती. भारतीय गोलंदाजी आक्रमण पाहता, बांगलादेशसाठी हे आव्हान कठीण नव्हे, तर अशक्य होतं. फलंदाजीत दमदार कामगिरी केल्यानंतर गोलंदाजीतही भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. बांगलादेशकडून फलंदाजी करताना लिटन दासने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर हृदोयने अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी बांगलादेशला विजय मिळवून देऊ शकली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com