Suryakumar Yadav Statement: 'मी खेळाडूंना सांगितलं होतं की..', मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवचं मोठं वक्तव्य

Ind vs Aus T20I Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. दरम्यान ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठं वक्तव्य केलं आहे.
suryakumar-yadav
suryakumar-yadavsaam tv news
Published On

India vs Australia 5th T20I Latest News:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी -२० सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय मिळवला. यासह टी -२० मालिकेवर ४-१ ने कब्जा केला.

सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानावर उतरला होता. पहिल्याच प्रयत्नात त्याला मालिका जिंकण्यात यश आलं आहे. दरम्यान मालिका जिंकल्यानंतर त्याने याचं श्रेय संघातील खेळाडूंना दिलं आहे.

ही मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, ' ही एक अप्रतिम मालिका होती. ज्याप्रकारे खेळाडूंनी खेळ केलाय ते कौतुकास्पद आहे. आम्हाला निडर होऊन खेळायचं होतं आणि खेळाचा आनंद घ्यायचा होता. आनंद तर होतोय पण तो (वॉशिंग्टन सुंदर) असायला हवा होता. या खेळपट्टीवर १६०-१७५ धावा आव्हानात्मक होत्या. त्यामुळे १० षटकांचा खेळ झाल्यानंतर मी खेळाडूंना सांगितलं होतं की, आपण अजूनही सामन्यात टिकून आहोत.'

suryakumar-yadav
Ind vs Aus 5th T2OI: कांगारुंना धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज! बंगळुरुत कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

या मालिकेत फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. या मालिकेत सर्वाधिक गडी बाद केल्यामुळे त्याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. त्याने ५ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना ९ फलंदाजांना माघारी धाडलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर रवी बिश्नोई म्हणाला की, ' पहिल्या सामन्यात मी गोलंदाजी केली नव्हती. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं हाच माझा प्लान आहे ' (Latest sports updates)

suryakumar-yadav
IND vs AUS 5th T20: 0 0 W 1 1 1...शेवटच्या षटकात अर्शदीपनं ऑस्ट्रेलियाला 'वेड' लावलं; टीम इंडियाचा ६ धावांनी रोमहर्षक विजय

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने २० षटक अखेर ८ गडी बाद १६० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला १५४ धावा करत आल्या. भारतीय संघाने हा सामना ६ धावांनी जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com