IND vs ENG, Weather Report: भारत -इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! ओव्हर्स कमी करायला केव्हा होणार सुरुवात? पाहा वेळ

IND vs ENG, T20 World Cup 2024: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सेमिफायनलच्या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. दरम्यान पाऊस आल्यास षटकं कमी करायला केव्हा सुरुवात होणार? जाणून घ्या.
IND vs ENG, Weather Report: भारत -इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! ओव्हर्स कमी करायला केव्हा होणार सुरुवात? पाहा वेळ
jos buttler with rohit sharmatwitter

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलचा सामना सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. स्पर्धेतील पहिल्या सेमिफायनलचा सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यासाठी राखीव दिवसाची घोषणा करण्यात आली होती.

तर दुसऱ्या सेमिफायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे या सामन्यासाठी अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. दरम्यान पावसाचं आगमन झाल्यास षटकं कमी करायला किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण.

षटकं कमी करायला केव्हा सुरुवात होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा सामना हा स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरु होईल. तर भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरु होईल. राखीव दिवस नसल्याने या सामन्यासाठी बराच वेळ दिला गेला आहे. जर पाऊस आला आणि सुरुच राहिला, तर १२:१० नंतर षटकं कमी करायला सुरुवात होईल.

IND vs ENG, Weather Report: भारत -इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! ओव्हर्स कमी करायला केव्हा होणार सुरुवात? पाहा वेळ
IND vs ENG, Semi Final: बचके रहना रे बाबा! सेमिफायनलमध्ये तळपते विराटची बॅट! रेकॉर्ड पाहून गोलंदाजांना फुटेल घाम

१०-१० षटकांचा सामना केव्हा सुरु होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली, तर १०-१० षटकांचा सामना खेळवण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी रात्री १:४४ पर्यंत कट ऑफ टाईम असणार आहे.

IND vs ENG, Weather Report: भारत -इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! ओव्हर्स कमी करायला केव्हा होणार सुरुवात? पाहा वेळ
IND vs ENG, Playing XI Prediction: सेमिफायनलमध्ये टीम इंडियाची प्लेइंग 11 बदलणार? रोहित या स्टार खेळाडूला संधी देणार?

मात्र जर हा सामना पूर्ण होऊ शकला नाही किंवा १० षटकांचा सामनाही होऊ शकला नाही, तर याचा फायदा भारतीय संघाला होणार आहे. सामना रद्द झाल्यास भारतीय संघाला थेट फायनलचं तिकीट मिळेल. कारण आयसीसीने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही .त्यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थानी असणारा संघ थेट फायनलसाठी पात्र ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com