
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे.
या डावात त्याला अवघ्या ३ धावा करता आल्या आहेत. यासह संपूर्ण मालिकेत त्याला अवघ्या २२ धावा करता आल्या आहेत. हा फ्लॉप शो पाहता, फॅन्स आता रोहितने निवृत्ती घ्यावी अशी मागणी करू लागले आहेत.
भारतीय संघाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीत आणखी एक सामना खेळायचा आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ काही महिने तरी कसोटी मालिका खेळणार नाहीये. जर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला तर, भारतीय संघ जूनमध्ये मैदानात उतरेल. त्याआधीच रोहित कसोटी क्रिकेटला रामराम करू शकतो.
पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका झाल्यानंतर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर सध्या मेलबर्नमध्येच आहेत. लवकरच रोहितच्या निवृत्तीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
रोहितची निवृत्ती हे भारतीय संघाच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. भारतीय संघाकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याची संधी आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाला दोन्ही कसोटीमध्ये पराभूत करावं लागणार आहे.
जर भारतीय संघाने ही मालिका जिंकली, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचू शकले नाहीत, तर रोहित याच मालिकेनंतर कसोटी क्रिकेटला रामराम करू शकतो. मात्र जर फायनलमध्ये प्रवेश केला, तर हा फायनलचा सामना त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.