
वहिनी आणि दिराच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून समोर येत आहे. नवविवाहित महिलेनं पती मुंबईला गेल्यानंतर दिराशी लग्न केलं आहे. महिलेचं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. लग्नाच्या एका महिन्यानंतर पती कामाच्या शोधात मुंबईत गेला. त्यानंतर महिलेचं दिरासोबत सूत जुळलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधत नव्या आयु्ष्याला सुरूवात केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
गोरखपूरमधील सहजनवा येथील रहिवासी खुशबूचे लग्न हरिहरपूरच्या कल्लूशी झाले होते. लग्नानंतर कल्लू नोकरीच्या शोधात मुंबईला गेला होता. त्यानंतर खुशबू आणि तिच्या दिरामध्ये जवळीक वाढली. दोघेही अधिक वेळ एकत्र घालवत होते. कुटुंबाला याची कुणकुण लागताच त्यांनी घरातून पळ काढला. नंतर नातेवाईकांनी त्यांचा शोध घेत दोघांना घरी परत आणले. मात्र दोघेही एकत्र राहण्याच्या निर्णयावर ठाम राहिले होते.
अखेर कुटुंबानेही त्यांच्या विवाहाला संमती दिली. हा विवाह हरिहरपूर नगरपंचायत कार्यालयात झाला. नगरपंचायत अध्यक्ष रवींद्र प्रताप शाही यांनी स्वतः हा विवाह विधी पार पडल्याची माहिती दिली. यावेळी स्थानिक नेते, नगरसेवक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. खुशबूच्या पूर्व पतीने विवाहाला हजेरी लावण्यास नकार दिला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.