Hathras Road accident : तेराव्यावरून परतताना अनर्थ घडला; भीषण अपघात १५ जणांचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

Hathras Road accident update : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
Hathras Road accident
accidentSaam tv
Published On

लखनऊ : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताती जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळी मॅक्स लोडर आणि बसचा भीषण अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्स लोडर या वाहनात ३० लोक होते. सर्व प्रवासी तेराव्याचं जेवून खंदौलीजवळील सेवला गावात परतत होते. त्याचवेळी या वाहनाचा भीषण अपघात झाला. आग्रा-अलीगड बायपासजवळील मीतई गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि महिला-पुरुषांचा समावेश आहे. अपघातील १५ जणांच्या मृत्यूनंतर मृतांच्या कुटुंबातील सदस्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Hathras Road accident
Nagpur Accident : ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू, १० जखमी

पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल यांनी सांगितलं की, 'या अपघातातील लोक सासनी येथून खंदौली येथे जात होते. या अपघातील चालकाला अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या अपघातातील ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना हायर सेंटर रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पीएम मोदी काय म्हणाले?

या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं. तसेच त्यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना २-२ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

Hathras Road accident
Ghatkopar Hoarding Accident: मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नको, पत्नीला केलेला कॉल ठरला शेवटचा; ठाण्यातल्या कुटुंबाचा आधारच हिरावला!

या अपघातातील जखमींना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून त्यांना अलीगडमधील रुग्णालायत हलविण्यात आलं आहे. या दुर्घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांच्या प्रति संवेधदना व्यक्त केली आहे. अपघात झाल्यानंतर पोलीस अधिक्षक निपुण अग्रवाल, जिल्हाधिकारी आशीष कुमार, सीओ हिमांशू माथुर पोलीस फोर्स ही घटनास्थळी पोहोचली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि गंभीर जखमींना ५०-५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या अपघातात ७ पुरुष, ४ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे. यात दोन भाऊ, मुलगा आणि आई, पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com