Rahul Gandhi: केंद्र सरकार देशाचा शत्रू; सोशल मीडियावर विद्यार्थ्यांसाठी मेसेज लिहित राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

Rahul Gandhi on UP Paper Leak: १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमध्ये पोलीस भरती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पेपर फुटल्याचं सांगण्यात आलं. ही भरती रद्द करत उत्तर प्रदेश सरकारने पुढील ६ महिन्यांत पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिलेत. उत्तर प्रदेशचे एसटीएफ या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Rahul Gandhi
Rahul Gandhi ANI

Rahul Gandhi on UP Paper Leak:

उत्तर प्रदेश पोलीस भरती पेपर लीक प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र आणि भाजपशासित उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत केंद्र सरकार देशाचा शत्रू असल्याचा आरोप केलाय. मागील काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षा झाली. पेपर लीक झाल्याची घटना या परीक्षेच्या दरम्यान घडली होती.(Latest News)

त्यानंतर विरोधी पक्षांकडून सातत्याने उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पेपरफुटीची तक्रार मिळाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी होणारी पोलीस भरती परीक्षा रद्द केलीय. पण या पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस नेते (Congress leader) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देशातील विद्यार्थी चिंतेत आहेत, कुठे विद्यार्थी भरतीसाठी तळमळत आहेत, कुठे पेपर फुटल्यामुळे विद्यार्थी निराश झालेत. तर कुठे नियुक्तीसाठी न्यायालयाच्या फेऱ्या मारत आहेत. विद्यार्थ्यांनी आवाज उठवला तर त्यांच्यावर लाठीचार्ज केला जात असल्याची टीका राहुल गांधींनी केलीय. सरकार सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण करत असल्याची टीका देखील राहुल गांधी यांनी केली.

ज्या संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत, अशा संस्थांना पंतप्रधान मोदींना त्यांच्या मित्रांना विकायचे आहे. त्यानंतर तरुणांना तेथे कंत्राटावर काम द्यायचं आहे, अस केंद्र सरकारचं धोरण असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. लोकसभेतील भाजपच्या घोष वाक्याचाही राहुल गांधींनी समाचार घेतला. शोषण ही या सरकारची हमी असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान पेपरफुटीच्या घटना घडल्याचं समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने पुढील ६ महिन्यांत पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश जारी केलेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिलेत.

Rahul Gandhi
Lok Sabha Election: राहुल गांधी वायनाड सीट सोडणार? या 2 लोकसभा जागांवरून निवडणूक लढवण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com