नवी दिल्लीत काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीची एक बैठक पार पडली. दोन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या बैठकीत राहुल गांधी यांनी देशाच्या राजकारणाबाबत खळबळजनक दावा केलाय. पुढील एका वर्षात सरकार कोसळेल, असं विधान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलयं. देशातील वाढता असंतोष आणि महागाई याबद्दल बोलताना काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींनी कोणतं भाकीत केलयं ? पाहूयात...
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढील वर्षात पदत्याग निश्चित आहे... देशातील हिंदू- मुस्लीम राजकारण लवकर संपणार... गरीब आणि श्रीमंत हा प्रमुख मुद्दा कायम राहणार आहे... तसचं महागाईचा मुद्दाही महत्त्वाचा आहे... देशातील आर्थिक असंतोषामुळे जनतेत नाराजी असून वाढल्या असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होईल, असं भाकीत राहुल गांधींनी अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत केले आहे. दरम्यान यावर भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. ही मुंगेरीलाल सारखी दिवास्वप्न असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलीय.
याआधी सुद्धा राहुल गांधींनी केंद्र सरकारवर अनेकदा टीका केलीय...2024 च्या निकालानंतर नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू यांनी बाजू बदलली, तर हे सरकार एका मिनिटात कोसळेल, असं विधान त्यांनी केलं होतं...त्यात आता 1 वर्षांनी सरकार कोसळण्याचं हे भाकीत फक्त राजकीय दबाव आणण्यासाठी आहे की देशाच्या राजकारणात खरोखरच भविष्यात मोठी घडामोड घडणार ? हे येणारा काळच ठरवेल...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.