CJI On Constitution: ''जनतेचा न्यायपालिकेवर विश्वास हेच आमचे श्रद्धास्थान''; संविधान दिनानिमित्त CJI डीवाय चंद्रचूड यांनी व्यक्त केला विश्वास

CJI On Constitution: प्रत्येक नागरिकासाठी न्यायपालिकेचे दरवाजे सदैव खुले आहेत. कोणीही न्यायालयात येताना घाबरू नये. जनतेचा न्यायपालिकेवर असलेला विश्वास हेच आमचे श्रद्धास्थान असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केले.
CJI On Constitution
CJI On ConstitutionSaam Digital
Published On

CJI On Constitution

प्रत्येक नागरिकासाठी न्यायपालिकेचे दरवाजे सदैव खुले आहेत. कोणीही न्यायालयात येताना घाबरू नये. जनतेचा न्यायपालिकेवर असलेला विश्वास हेच आमचे श्रद्धास्थान आहे. न्यायालयात येणारे प्रत्येक प्रकरण संविधानानुसार चाललेल्या राज्याचे उदाहरण आहे. राज्यघटनेने इतर प्रकरणांसोबत राजकीय वाद सोडवण्याचा अधिकारही दिला आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हे या संविधानाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केले. ते संविधान दिनाच्या समारंभात बोलत होते.

शुद्ध हवा आणि शुद्ध पाण्याच्या आशेने लोक सर्वोच्च न्यायालयात येतात. पोस्टकार्डच्या जमान्यातही सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून न्याय देण्याची विनंती करून समाधान मानत असतात, इतका विश्वास लोकांचा न्यायपालिकेवर आहे. मीडिया रिपोर्ट्स याचे साक्षिदार आहेत. तसेच मागच्या वर्षी राष्ट्रपतींनी कारागृरांमधील गर्दीवर चिंता व्यक्त केली होती. यावरही काम झाले आहे. कारागृह आणि ट्रायल कोर्टात आदेश पोहोचवण्याची व्यवस्थेला अधिक गती देण्यात आली आहे. शिवाय जुन्या कारागृहांचे नियम दुरुस्त करण्यासाठी पडताळणी केली जात आहे, असे ते म्हणाले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CJI On Constitution
Israel-Hamas War Update: हमासने १७ ओलिसांची केली सुटका, बदल्यात ३९ पॅलेस्टाईन कैदी वेस्ट बँकमध्ये दाखल

बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या स्थापनेवर मत मांडताना डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा न्यायालयापर्यंत पोहोचण्याचा अधिकार हा घनात्मक अधिकार असून स्वातंत्र्याचा गाभा आहे. राज्यघटना ज्याप्रमाणे राजकीय मतभेद सोडवण्याची परवानगी देते, त्याचप्रमाणे न्यायालय आम्हाला वादविवाद सोडवण्याची परवानगी देते. तसेच आपण प्रजासत्ताक आणि संविधान दिन का साजरा करतो यांचे उत्तर वसाहतवाद ते स्वातंत्र्याच्या इतिहासात आहे. जिथे स्वातंत्र्याचे निर्णय केवळ जनकल्याणासाठी घेतले गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की, भारताच्या संविधानाचे आणि स्वातंत्र्याचे काय पुढे काय होईल. ते म्हणाले की भारताने केवळ घटनात्मक लोकशाही राखली नाही तर ती जनतेने आत्मसातही केली.

CJI On Constitution
Pm Modi Security Lapse : PM मोदींच्या सुरक्षेत चूक! पोलीस अधीक्षकांसह २ डीएसपी, ४ इन्स्पेक्टर निलंबित; सरकारची मोठी कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com