Breaking News

Palghar Sailor : पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय खलाशाचा मृत्यू; भारतात सव्वा महिन्यांनी मृतदेह आणणार, काय आहे प्रकरण?

Palghar Dahanu Sailor dies : पाकिस्तानच्या तुरुंगात बंदिस्त भारतीय खलाशी विनोद लक्ष्मण कोल यांचा १७ मार्चला मृत्यू झाला. विनोद हे पालघरच्या डहाणू येथे राहायला होते.
Palghar Sailor : पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय खलाशाचा मृत्यू; भारतात एका महिन्यांनी मृतदेह आणणार, काय आहे प्रकरण?
Palghar Sailor Saam tv
Published On: 

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या तुरुंगात बंदिस्त भारतीय खलाशी विनोद लक्ष्मण कोल यांचा १७ मार्चला मृत्यू झाला. विनोद हे पालघरच्या डहाणू येथे राहायला होते. डहाणूतील त्यांच्या गावातील लोकांना विनोद परतेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांची दीड महिन्यापूर्वी प्राणज्योत मालवली. पाकिस्तान विनोद कोल यांचा मृतदेह तब्बल दीड महिन्यांनी भारतात पाठवणार आहे.

पाकिस्तानने भारतीय सांगरी नियंत्रण रेषा ओलांडलेल्या जहाजामधील विनोदला जेरबंद केलं. जहाजावर काम करणाऱ्या खलाशी विनोद यांना दोन महिन्यापूर्वी पाकिस्तानने ताब्यात घेतलं. मीडिया रिपोर्टनुसार, ८ मार्चला आंघोळ करताना लक्ष्ण यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांचा १७ मार्च रोजी मृत्यू झाल्याचे इतर कैद्यांना सांगितले. या घटनेनंतर जेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाला संपर्क साधून विनोद यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली.

Palghar Sailor : पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय खलाशाचा मृत्यू; भारतात एका महिन्यांनी मृतदेह आणणार, काय आहे प्रकरण?
Naseem Khan: काँग्रेसची भूमिका छळाची, ४८ पैकी एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार नाही; नसीम खान कडाडले

या घटनेनंतर विनोद यांच्या कुटुंबाने स्थानिक आमदाराच्या मदतीने पाकिस्तानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पुढे या प्रकरणी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मदतीने पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह भारतात पाठविण्यास तयार झाले.

पाकिस्तानमधील भारतीय कैद्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी जतीन देसाई यांनी म्हटलं की, 'भारत सरकारला भारतीय कैद्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. यानंतर विनोद यांचं नाव महाराष्ट्राच्या कैदीच्या यादीत मिळालं'.

Palghar Sailor : पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय खलाशाचा मृत्यू; भारतात एका महिन्यांनी मृतदेह आणणार, काय आहे प्रकरण?
UPSC Exam 2025: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! यूपीएससी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, वाचा एका क्लिकवर

35 भारतीय खलाशांची सुटका

तत्पूर्वी, भारतीय सांगरी नियंत्रण रेषा ओलांडून गेलेल्या १८३ कैद्यांपैकी ३५ कैद्यांची सुटका ३० एप्रिल रोजी होणार आहे. यामध्ये डहाणूमधील ५ खलाशांचा समावेश आहे. हे खलाशी डहाणूमध्ये २-३ मेपर्यंत घरी पोहोचण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com