
भारताने एअर स्ट्राइकद्वारे पाकिस्तानला धडा शिकवला. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. मध्यरात्री भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही प्रतिहल्ल्याला तोंड देण्यासाठी भारताने तयारी सुरु केली आहे. देशातील १८ विमानतळ बंद करण्यात आली आहेत.
भारताने एअर स्ट्राइकद्वारे पाकिस्तानला धडा शिकवला. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. मध्यरात्री भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही प्रतिहल्ल्याला तोंड देण्यासाठी भारताने तयारी सुरु केली आहे. देशातील १८ विमानतळ बंद करण्यात आली आहेत.
फ्लाइटराडार-२४ नुसार, आतापर्यंत सुमारे ४३० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. उड्डाणे रद्द करण्याच्या बाबतीत इंडिगो एअरलाइन्स आघाडीवर होती आणि त्यांच्या सुमारे १६० उड्डाणे रद्द करण्यात आली. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंडीगड आणि राजकोट या विमानतळांवर फ्लाइट्स १० मे सकाळी ५.२९ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात मोठे विमानतळ असलेल्या दिल्ली आयजीआय विमानतळावरुन दुपारी १२ वाजल्यापासून किमान ३५ फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये चार आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सचा देखील समावेश आहे. इंडिगो एअरलाइन्स, अकासा एअर यांनीही विमानसेवा तात्पुरत्या वेळेसाठी बंद राहणार असल्याचे प्रवाशांना कळवले आहे. प्रवाशांना रिफंड मिळेल किंवा तिकीटांचा १० मेनंतर वापर करता येईल असे विमान कंपन्यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.