
काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांचा जीव घेतला. पहलगाम हल्ल्याचा बदला बुधवारी (७ मे) मध्यरात्री भारताने घेतला. भारताच्या तिन्ही दलांनी मिळून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. हवाई हल्ले करत भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ अड्डे नष्ट केले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात गोळाबार करण्यात आला. काही ठिकाणी गोळीबार सुरु असल्याचे म्हटले जात आहे. या गोळीबारामध्ये काही निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत उच्चस्तीय बैठक घेणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला युरोप दौरा रद्द केला आहे.
१३ ते १७ मे २०२५ या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युरोपतील क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलँड्सला भेट देण्यासाठी जाणार होते. ते नॉर्वेमध्ये नॉर्डिक परिषदेत सहभागी होणार होते. सद्यस्थिती लक्षात घेता त्यांनी हा दौरा रद्द केला असून संबंधित देशांना याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती मंत्रिमंडळाला दिला. सेनेचे कौतुक करत ऑपरेशन सिंदूर हे देशासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे असे मोदी म्हणाले.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांचा जीव घेतला होता. या हल्ल्यानंतर १५ दिवसांत भारताने पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने फक्त २५ मिनिटांमध्ये पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. ऑपरेशन सिंदूरने देशभरात जल्लोष सुरु असताना पाकिस्तानने सीमावर्ती भागात गोळाबार करण्यात आल्याची माहिती समोर आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.