
India Vs Pakistan : भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान भारतातील मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधून पळून गेल्याचे म्हटले जात आहे. दाऊद मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानमधील कराची शहरात राहत होता. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने दाऊद इब्राहिम, त्याचे खास साथीदार छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा यांना लपण्यास मदत केली.
एबीपी लाइव्हने दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा हे तिघेही सध्या पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशात पळून गेले आहेत. भारताच्या हवाई हल्ल्याने, ऑपरेशन सिंदूरने घाबरुन जीव वाचवण्यासाठी दाऊद इब्राहिम पळत असल्याचा दावा सूत्रांनी केली आहे. कदाचित दाऊद आणि त्याचे साथीदार पाकिस्तानमध्येच लपले असून ते पाकिस्तान सोडून गेल्याचे वृत्त दिशाभूल करण्यासाठी पसरवले जात असल्याचे एजन्सीच्या सूत्रांनी म्हटले आहे.
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. भारताच्या तिन्ही दलांनी मिळून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली होती.
इशारा देऊनही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि काल ८ मे रात्री भारतातील जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या राज्यांमधील भागांमध्ये मिसाईल आणि ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण हे हल्ले भारताने हाणून पाडले. पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याने भारत-पाकिस्तान संबंध आणखी ताणले गेले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.