जम्मू, सांबा आणि पठाणकोटमध्ये पाककडून ड्रोन हल्ला
जैसलमेरमध्ये पाककडून पुन्हा ड्रोन हल्ला, भारताने पाडले ड्रोन्स
#WATCH | Uri, J&K: Gunshots and explosions heard as Pakistan resumes arms and artillery fire along the LOC in Uri sector.
— ANI (@ANI) May 9, 2025
Visuals deferred by unspecified time. pic.twitter.com/7AngrvttIp
पाकिस्तानने काल रात्री केलेल्या या भ्याड हल्ल्याचा हेतू भारतीय शहरं, नागरी पायाभूत सुविधा आणि सैन्य आस्थापनांना लक्ष्य करण्याचा होता. भारतीय सैन्याने जबाबदारीने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यांचे अधिकृत आणि स्पष्टपणे खोटे नाकारणे, हे त्यांच्या दुटप्पीपणाचे उदाहरण आहे, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री म्हणाले.
India Vs Pakistan: भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढलाय. भारतीय लष्कराकडून थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.
#WATCH राजस्थान: जैसलमेर जिला प्रशासन पूरे शहर में शाम 5 बजे बाजार बंद करने की घोषणा कर रहा है। pic.twitter.com/sATPHjBqMI
— ANI_HindiNews (@AHindinews) May 9, 2025
१५ मेपर्यंत फटाके फोडू नका, ड्रोनवरही बंदी; गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांचे आवाहन
- गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांचे आवाहन
- या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत गुजरातमध्ये कोणत्याही कार्यक्रमात फटाके फोडण्यास बंद
- ड्रोन उडवण्यास देखील परवानगी नाही.
- कृपया सहकार्य करा आणि निर्देशांचे पालन करा.
देशातील एअरपोर्टवर अलर्ट जारी
भारत -पाकिस्तानमधील तणाव वाढला.
देशातील सर्वच एअरपोर्टवर अलक्ट जारी करण्यात आले.
गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेमध्ये आज देशात सुरक्षा वाढवण्याबाबत पाऊल उचलण्यात आले.
भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या वातावरणात आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थोड्याच दिवसात नवीन वेळापत्रक आणि ठिकाणाची घोषणा केली जाणार आहे.
भारत पाकिस्तान यांच्यातील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात इंडियन आर्मीची पत्रकार परिषद होणार आहे. साडेपाच वाजता देशाला संबोधित करण्यात येणार आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा लखनौ दौरा पुढे ढकलला
संरक्षणमंत्र्यांनी आज तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठकही घेतली
भारत- पाकिस्तानमधील तणाव वाढला, दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर शुक्रवारी दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.
सरकारी इमारती, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, न्यायालये आणि परदेशी दूतावासांसह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पोलिसांनी बाजारपेठ, रेल्वे स्थानके, मॉल, उद्याने आणि मेट्रो स्थानके यासारख्या जास्त रहदारी असलेल्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवली.
भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारताच्या सीमेवर हल्ले होत आहे. याचदरम्यान, आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही, असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Delhi | Union Minister Shivraj Singh Chouhan says, "...We will not spare the terrorists; we attacked the terror hotspots but not the civilians...As the agriculture department, our responsibility is to ensure food security. Our agricultural reserves are full. Whether… pic.twitter.com/3qq607ylQ0
— ANI (@ANI) May 9, 2025
दिल्लीत आज दुपारी ३.०० वाजत सायरन टेस्टिंग होणार आहे. यासाठी सर्वजण तयार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सायरन वाजवले जाणार आहे.
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एटीएम सेवा बंद होणार असल्याचा मेसेज व्हायरल होत होता. मात्र, एटीएम सेवा पूर्णपणे सुरळीत सुरु असल्याचे आता सांगितले आहे.
RSS ने ट्विट करत भारतीय सैन्याचे अभिनंदन केले आहे. ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांचे कौतुक केले आहे.
RSS tweets, " Hearty congratulations to the leadership of the Government of India and the armed forces for the decisive action “Operation Sindoor” being taken against the Pak-sponsored terrorists and their supporting ecosystem after the cowardly terrorist incident of Pahalgam.… pic.twitter.com/GZPvyb0S3T
— ANI (@ANI) May 9, 2025
मनोज सिन्हा हे उरीमधील सैनिकांना भेटण्यासाठी आले आहे. उरीमधील परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत.
#WATCH | J&K LG Manoj Sinha arrives in Uri to meet security forces and review the ground situation
— ANI (@ANI) May 9, 2025
Pakistan had targeted civilian areas in the Uri sector, last night pic.twitter.com/Bgd5TGSeLK
वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष अजय बांगा यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे.
President of the World Bank Group, Ajay Banga, meets Uttar Pradesh CM Yogi Adityanath in Lucknow
— ANI (@ANI) May 9, 2025
(Source: CMO) pic.twitter.com/CZP5vMkJHd
अमित शाह यांनी बीएसएस अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलवली आहे. दुपारी १२.३० वाजता ही बैठक होणार आहे.
Union Home Minister Amit Shah to convene a meeting at 12:30 pm with the Director General of BSF, the Director General of CISF, and senior officials of the Ministry of Home Affairs to review the border situation and airport security arrangements. pic.twitter.com/4hjvF4L1KH
— ANI (@ANI) May 9, 2025
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जम्मू येथील सरकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. पूंछमधील हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची त्यांनी भेट घेतली आहे.
#WATCH | J&K CM Omar Abdullah reaches the govt hospital in Jammu to meet the people who were injured in the Pakistan shelling that took place in Poonch pic.twitter.com/GXR3HUylWn
— ANI (@ANI) May 9, 2025
भारत पाकिस्तान हल्ल्यावर सर्व क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनीदेखील आपले मत मांडले आहे.
#WATCH | Delhi | Congress leader Sandeep Dikshit says, "All the acts done by Pakistan and its army are cowardly. They do not have the courage to fight with dignity...Tell me one thing in the last 40-50 years that they have done with dignity...Now Pakistan is trapped. On one side,… pic.twitter.com/msTmRP0TRG
— ANI (@ANI) May 9, 2025
#WATCH | Chandigarh Police advises citizens to move indoors when sirens are sounded in the city pic.twitter.com/YKzQMUyBqy
— ANI (@ANI) May 9, 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज बैठक बोलवली आहे. त्यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबच बैठक ठेवली आहे. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे.
भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे जम्मू आणि उद्दामपूरवरुन दिल्लीला येण्यासाठी ३ स्पेशल ट्रेन सोडणार आहे.
In view of the current situation, Indian Railways plans to run three special trains from Jammu and Udhampur to Delhi, says Indian Railways.
— ANI (@ANI) May 9, 2025
पाकिस्तानने वर्ल्ड बँकेकडे आता कर्ज मागितले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने लोन मागितले आहे. भारताने पाकिस्तानला नाकीनऊ करुन सोडले आहे.
चंदीगढमध्ये सध्या हाय अलर्ट आहे. सायरन वाजवत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
#WATCH | Air siren sounded in Chandigarh as part of a precautionary measure to remind citizens to remain alert pic.twitter.com/IOl2RRqW0G
— ANI (@ANI) May 9, 2025
भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर लेहमध्ये ९ आणि १० तारखेला शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये सध्या भीतीचे वतावरण आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उद्दामपूर मार्गे जम्मूकडे रवाना झाले आहेत.
#WATCH | Jammu & Kashmir CM Omar Abdullah's convoy heads to Jammu via Udhampur
— ANI (@ANI) May 9, 2025
The CM is heading to Jammu to take stock of the situation after last night’s failed Pakistani drone attack directed at Jammu city & other parts of the division.
Visuals from Udhampur pic.twitter.com/8danda7v30
भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पीएसएल मॅच यूएईमध्ये होणार आहेत.
#WATCH | Jammu and Kashmir | A gate at the Baglihar Hydroelectric Power Project Dam built on the Chenab River in Ramban has been opened.
— ANI (@ANI) May 9, 2025
(Visuals from the spot shot around 8:15 am) pic.twitter.com/wDsQQqnOzf
जम्मू काश्मीरमध्ये काल रात्री खूप तणावाचे वातावरण होते. काल रात्री ड्रोन हल्ले करण्यात आले. यात जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरील नागरिकांची घरे अक्षरशः जळाली, या घरांचे खूप जास्त नुकसान झाले आहे.
#WATCH | Burnt and damaged civilian houses and shops in a border village of Jammu & Kashmir after Pakistan resorted to heavy shelling last night
— ANI (@ANI) May 9, 2025
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/ZClcxAnPiK
#WATCH | Vehicles and shops suffered damage in unprovoked shelling by Pakistan in a border town in Jammu & Kashmir
— ANI (@ANI) May 9, 2025
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/a29nHiwvoZ
उरी, नौशेरा आणि कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील भागात पाकिस्तानकडून अजूनही गोळीबार सुरू आहे.
पाकिस्तानला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेल्या पाकिस्तानकडून राजस्थान आणि जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात रात्रभर हल्ले सुरू आहेत.
- भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे.
- मध्यरात्री एलओसीवर दोन्ही बाजूने हवाई हल्ले आणि ड्रोन हल्ले
- भारताने पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला
- पाकिस्तानचे ५० हून अधिक ड्रोन पाडले
जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC) स्फोटांचा आवाज ऐकू आल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूर हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात पुंछ आणि राजौरी भागात तीव्र तोफखाना आणि मोर्टार हल्ले केले. यामुळे अनेक गावांमध्ये नुकसान झाले असून, स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. स्फोटांचे नेमके कारण आणि नुकसानीची व्याप्ती याबाबत अधिकृत माहिती येणे बाकी आहे.
#WATCH | Poonch, Jammu and Kashmir: Explosions heard near Line of Control (LoC). More details awaited
— ANI (@ANI) May 8, 2025
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/bQRqxOdPWB
जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC) स्फोटांचा आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर आणि पाकिस्तानने प्रत्युत्तरात गोळीबार व तोफखान्याचा मारा केल्यानंतर घडली. स्थानिकांनी रात्री मोठे स्फोट आणि सायरनचा आवाज ऐकल्याचे सांगितले, ज्यामुळे पुंछमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. अधिकृत माहिती अद्याप येणे बाकी आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात पाकिस्तानला कडक इशारा देताना परखड वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, "हा नवा भारत आहे. हा घरात घुसून मारणारा भारत आहे. पाकिस्तानने हद्दीत राहावे. त्याच्या कारवायांचा त्याला भारी फटका बसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे."
#WATCH | Nagpur: On #OperationSindoor, Maharashtra Deputy CM Eknath Shinde says "...'Yeh naya Bharat hai. Yeh ghar mein ghuske maarne wala Bharat hai'...Pakistan should stay within limits. Pakistan's actions are going to cost it heavily. PM Modi has taught them a lesson with… pic.twitter.com/QNb3LaJCHd
— ANI (@ANI) May 8, 2025
इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी नवी दिल्लीतून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांच्याशी फोनवर संवाद साधला. या चर्चेदरम्यान अराघची यांनी भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (२२ एप्रिल २०२५) भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले, ज्यामुळे तणाव वाढला आहे. अराघची यांनी यापूर्वी दोन्ही देशांना संयम राखण्याचे सांगितले असून, इराण मध्यस्थी करण्यास तयार आहे.
जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर (LoC) ८ मे २०२५ रोजी रात्री सुमारे ११ वाजता घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला. बीएसएफ जम्मूने सांगितले की, आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या घुसखोरीचा प्रयत्न नाकाम करण्यात यश आले. ही घटना भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घनली, जिथे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवादी तळांवर हल्ले केले. सांबा येथील घुसखोरीच्या प्रयत्नामुळे सीमेवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे, आणि बीएसएफ उच्च सतर्कतेवर आहे.
भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या प्रत्युत्तर कारवाईदरम्यान सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री इस्लामाबादला भेट देणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव कमी करण्याच्या उद्देशाने त्यांचा हा दौरा आहे. सध्या भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केल्याने दोन्ही देशांमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. सौदी अरेबियाचा हा कूटनीतिक प्रयत्न तणाव निवळण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
भारतावर हल्ला करण्यासाठी आलेली पाकिस्तानची अत्याधुनिक विमाने हाणून पाडली. एफ 16 आणि जेएफ 17 विमानंही पाडण्यात आली आहेत. एफ 16 आणि जेएफ 17 ही विमाने चीनने पाकिस्तानला दिली होती. मात्र, भारताच्या प्रतिहल्ल्यात चीनकडून मोठा गवगवा करण्यात येत असलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही विमाने पाडण्यात आली आहेत.
दिल्ली विमानतळाने प्रवास सल्ला जारी केला आहे. विमानतळाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही, परंतु बदलत्या हवाई क्षेत्रातील परिस्थिती आणि वाढलेल्या सुरक्षा उपायांमुळे काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी आपल्या विमान कंपनीकडून नवीनतम माहिती तपासावी.हवाई सुरक्षा उपायांबद्दल अधिक माहितीइतर भारतीय विमानतळांचे अपडेट
Delhi Airport issues travel advisory. Operations remain normal. Some flights are impacted due to changing airspace conditions and heightened security. Passengers are advised to check with their airline for the latest updates. pic.twitter.com/d35W0pbzD5
— ANI (@ANI) May 8, 2025
पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडण्यात आले. भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स युनिट्सने जम्मू-काश्मीरच्या नौसेरा सेक्टरमध्ये ही कारवाई केली. संरक्षण विभागाच्या सूत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.
भारतीय लष्कराने ७ मे २०२५ रोजी बलुचिस्तानमधील क्वेटा येथे मोठा हल्ला केल्याचा दावा 'DNA India' च्या वृत्तात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या (२२ एप्रिल २०२५) प्रत्युत्तरात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने क्वेटा आणि इतर १२ पाकिस्तानी शहरांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले केले. यात पाकिस्तानी लष्कराचे नुकसान झाले असून, क्वेटामधील लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानने याला "युद्धाची कृती" संबोधून भारताला इशारा दिला आहे.
India Pakistan Attack LIVE - आयएनएस विक्रांतचा धमाका, कराची पोर्ट उडवले . कराचीवर हल्ला करत भारताने पाकड्यांच्या नौदलाची ताकद कमी केली.
INS विक्रांतने कराची बंदरगाहावर हल्ला केला आणि त्यामुळे बंदरगाह आणि शहरात मोठी आग लागली. कथितपणे ओरमारा बंदरगाहावरही मिसाइल हल्ले झाले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. तर दोन्हीकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल् करण्यात येत आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलं आहे. सध्या मर्यादित युद्ध सुरू आङे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये या संघर्षाला तोंड फुटलं आहे.
पठाणकोटमध्ये भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानचे लढाऊ विमान हाणून पाडले आहे. भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. भारताकडून पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला प्रतुत्तर देण्यात येत आहे. जम्मू काश्मीर, राजस्थानसह आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताने नाकाम केलेय. भारताने पाकिस्तानची तीन लढाऊ विमाने हाणून पाडली आहेत. पाकिस्तानचे दोन सैनिक पकडण्यात आले आहे. भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर दाखल उत्तर देण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.