

उत्तर प्रदेशध्ये भीषण अपघाताची घटना घडली
भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने ई-रिक्षाला धडक दिली
अपघातामध्ये ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला
या अपघातामध्ये ३ जण गंभीर जखमी झालेत
उत्तर प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण लग्नसमारंभासाठी तांदूळ मागण्यासाठी जात असताना ही घटना घडली. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी उझानी येथील बरेली-मथुरा महामार्गावर जुनुइया गावातील करुआ पुलाजवळ हा अपघात झाला. भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने ई-रिक्षाला धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरवन नगला येथील ९ जण घरोघरी जाऊन तांदूळ मागण्यासाठी कोतवाली भागातील गरहौना गावाकडे ई-रिक्षाने जात होते. करुआ पुलाजवळ समोरून येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रॅक्टर-ट्रॉलीने ई-रिक्षाला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षातील ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले. या अपघातात ई-रिक्षाचा चुराडा झाला. काही मृतदेहांचे अक्षरश: तुकडे झाले.
या अपघातामध्ये प्रेमा, गंगाश्री, राजकुमारी, रेवती, नारायणी आणि कासगंज येथील गुलाबगढ़ी येथील रहिवासी नारायणी देवी यांचा मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये २ महिला आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. तिघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाही महिलांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी सांगितले की, मुरवन नगला येथील रहिवासी दलचंद मौर्य यांचा मुलगा कुंवरपाल याचे लग्न २९ जून रोजी होणार होते. लग्नसमारंभाचा एक भाग म्हणून नातेवाईक तांदूळ मागण्यासाठी गरहौना येथे जात होते. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोगर कोसळला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.