Sam Pitroda : सॅम पित्रोदा यांना काँग्रेसकडून मिळाली मोठी जबाबदारी; लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाने केली होती कारवाई

Sam Pitroda news : सॅम पित्रोदा यांना काँग्रेसकडून पुन्हा मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्यावर पक्षाने लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठी कारवाई केली होती.
सॅम पित्रोदा यांना काँग्रेसकडून मिळाली मोठी जबाबदारी; लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाने केली होती कारवाई
Sam Pitroda StatementSaam TV
Published On

नवी दिल्ली : सॅम पित्रोदा यांना काँग्रेसने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिली आहे. काँग्रेसने सॅम पित्रोदा यांना पुन्हा एकदा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली आहे. सॅम यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना पदावरून हटवले होते. त्यानंतर बुधवारी त्यांची पुन्हा एकदा नियुक्ती केली आहे.

पित्रोदा यांनी मे महिन्यात पदाचा राजीनामा दिला होता. पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस वादात अडकली होती. त्यानंतर सॅम पित्रोदा यांनी स्वत:ला पक्षापासून वेगळं केलं. यादरम्यान, काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत सॅम पित्रोदा यांनी पद सोडल्याचे जाहीर केले होते. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांनी स्वत:हून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचं अध्यक्षपद सोडल्याचे जाहीर केले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला होता.

सॅम पित्रोदा यांना काँग्रेसकडून मिळाली मोठी जबाबदारी; लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाने केली होती कारवाई
Rahul Gandhi Video: मोठी बातमी! राहुल गांधी असणार लोकसभेतील विरोधी पक्षनेते, इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमताने निर्णय

सॅम पित्रोदा यांनी काय म्हटलं होतं?

एका मुलाखतीत लोकशाहीवर भाष्य करताना सॅम पित्रोदा यांनी म्हटलं होतं की, 'मागील ७५ वर्षांपासून भारतीय आनंदात राहत आहेत. आपण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला एक संघ ठेवू शकतो. ईशान्य भागात राहणारे लोक चीनी लोकांसारखे दिसतात. तर पश्चिमेतील लोक अरेबियन लोकांसारखे दिसतात. उत्तर भागातील लोक गोऱ्या लोकांसारखे दिसतात. दक्षिण भारतातील लोक आफ्रिकेतील लोकांसारखे दिसतात'. भारतात राहणारे लोक वेगवेगळ्या भाषेचे आहेत. त्यांच्या धर्म, जेवण, परंपरेचा आदर करतो, असेही त्यांनी म्हटलं होतं.

सॅम पित्रोदा यांना काँग्रेसकडून मिळाली मोठी जबाबदारी; लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाने केली होती कारवाई
Maharashtra Politics: दोघात तिसरा! ठाकरे गट-भाजप लढतीत काँग्रेस ठरणार लाभार्थी, कल्याण पूर्व विधानसभेवर ठोकला दावा?

'या भारतावर माझा विश्वास आहे. तिथे प्रत्येकाला जागा आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली होती. सॅम यांच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

दरम्यान, सॅम यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी भाष्य केलं होतं. भारताच्या विविधतेची तुलना करताना अशी उदाहरणे स्वीकारले जाऊ शकत नसल्याचे जयराम रमेश यांनी म्हटलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com