Maharashtra Assembly Session : प्रथा कायम, चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, पावसाळी अधिवेशनात होणार कडकडाट!

Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.
विरोधकांची प्रथा कायम; सत्ताधाऱ्याच्या चहापानावर बहिष्कार, पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार
MVA Seat-Sharing Formula for Upcoming Assembly ElectionSaam Tv

गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन येत्या २७ जून रोजी सुरु होणार आहे. यंदा होणारे पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजण्याची शक्यता आहे. या पावसाळी अधिवशेनाला एक दिवस बाकी असताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

विरोक्षी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांकडून चहापानांचं निमंत्रण मिळालं. परंतु महायुती सरकारने राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम केलं आहे. अभद्र युती आणि अनैतिक संगत असं पहिल्यांदा राज्याला पाहायला मिळत आहे. फुगलेल्या छातीतील हवा काढण्याचं काम महाराष्ट्रातील मतदारांनी केलं. त्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो'.

'महायुतीचं शेवटचं अधिवेशन आहे. या सरकारने जनाधार गमावला आहे. आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे. त्यांच्या कर्मभूमीत बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यात आलं आहे. जनतेने त्यांना सांगितलं की, त्यांची हुकूमशाही फार काळ चालणार नाही. हे जनतेने दाखवून दिलं आहे. हे विश्वासघातकी सरकार आहे, असे वडेट्टीवार पुढे म्हणाले.

विरोधकांची प्रथा कायम; सत्ताधाऱ्याच्या चहापानावर बहिष्कार, पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार
Maharashtra Pavsali Adhiveshan: अधिवेशनात गाजणार २० मुद्दे, त्यातील ५ मुद्द्यांवर आधीच रण पेटलंय!; 'मविआ'चा मास्टर प्लान

'मोदी सरकारनं उत्पादन शुल्काच्या दीडपट हमीभाव देणार असल्याचं सांगितलं. शेतकऱ्याना फसवण्याचं काम महापापी सरकारने केलं. दीडपट हमीभाव देता येत नाही. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असे ते पुढे म्हणाले.

विरोधकांची प्रथा कायम; सत्ताधाऱ्याच्या चहापानावर बहिष्कार, पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार
Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार? महायुतीतील आमदारांची मागणी?

'कृषीमुल्याच्या बैठकीला मुख्यमंत्री गेले होते. त्यांनी मागण्या केल्या, पण मिळालं काय? तर खतावर जीएसटी ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे नतभ्रष्ट सरकारने शेतकऱ्यांच्या खतावर, अवजरांवर जीएसटी लावला आहे. अंत्यविधीच्या प्रत्येक वस्तूवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. ५० किलोची युरियाची बॅग ही ४० किलोची केली आहे. १० किलो युरिया कमी झाला आहे. हा युरिया कोण खातोय? त्याचे पैसे कोण खातंय, असा सवाल त्यांनी विचारला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com