उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून रस्ते अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. नवाजगंज पोलिस ठाण्याचा हद्दीत इनायतपूर गावाजवळ हा अपघात झाला आहे. मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीच्या पुढील भागाचा पार चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि दोन लोक गंभीर जखमी झाले आहेत. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची कसून चौकशी केली जात आहे.
इनायतपुर गावाजवळ गुरूवारी सकाळी ही घटना घडली. अपघातग्रस्त कुटुंब लखमीपूर जिल्ह्यातील असून स्कॉर्पिओमधून संपूर्ण कुटुंब पंजाबला जात होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार ट्रक इतक्या वेगात होता की स्कॉर्पिओचा पार चक्काचूर झाला. कुटुंबातील तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला असून स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान ट्रकचालकाने अपघात होताच घटनास्थळावरून फरार झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातादरम्यान काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहने पर्यायी मार्गाने वाहने वळवत वाहतूक सुरळित केली.
अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातादरम्यान काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहने पर्यायी मार्गाने वाहने वळवत वाहतूक सुरळित केली.
पोलिस या अपघाताचा तपास करत असून अपघाताचे नेमके कारण लवकरच समोर येणार आहे. प्राथमिक तपासात ट्रकचा वेग हे अपघाताचे कारण असले तरीही, सीसीटिव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाबानुसार पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. महामार्गावर वेगाचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे.