Delhi Politics: दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव, राज्यपालांद्वारे पत्रव्यवहार; आपचा गंभीर आरोप

Delhi Breaking News: दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव आहे. यासाठी केंद्र सरकारकडून मोठं राजकीय षडयंत्र रचले जात आहे, असा गंभीर आरोप दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी केला आहे.
Arvind Kejriwal Narendra Modi
Delhi Breaking NewsSaam TV

Delhi Liquor Scam Case

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव आहे. यासाठी केंद्र सरकारकडून मोठं राजकीय षडयंत्र रचले जात आहे, असा गंभीर आरोप दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी केला आहे. येत्या काही दिवसांत दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. आम्हाला त्यासंदर्भात सूत्रांकडून माहिती मिळाली आहे, असंही आतिषी यांनी म्हटलं आहे.

Arvind Kejriwal Narendra Modi
Maharashtra Politics: 'शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा दिला होता सल्ला', फडणवीस यांचा गौप्यस्फोट

कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) गेल्या २२ दिवसांपासून सध्या तुरुंगात आहेत. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी भाजपची मागणी आहे. यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात तीन वेळा याचिका देखील दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, कोर्टाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

अरविंद केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवतील, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. तर भाजप आणि नायब राज्यपालांकडून केजरीवालांवर सातत्याने पदाचा राजीनामा न देण्यावरून टीका केली जात आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी शुक्रवारी मोठा आरोप केला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं सरकार बरखास्त करण्यासाठी नायब राज्यपालांकडून केंद्र सरकारला आक्षेपार्ह पत्र लिहली जात असल्याचं आतिषी यांनी म्हटलं आहे. आम आदमी पक्षाने फेब्रुवारी महिन्यात विधानसभेत बहुमत सिध्द केले आहे. सत्तेत असलेल्या पक्षाकडे बहुमत असले तर राष्ट्रपती राजवटीचा आदेश दिला जाऊ शकत नाही, असंही आतिषी यांनी म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांच्याजवळ विधानसभेत स्पष्ट बहुमत आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणे बेकायदेशीर ठरेल. केजरीवाल यांना ईडी आणि केंद्र सरकारने कोणत्याही आरोपाशिवाय अटक केली हे एक मोठे कारण आहे. कारण भारतीय जनता पक्षालाही माहीत आहे की त्यांनी कितीही कारस्थान केले तरी ते केजरीवालांना दिल्लीत पराभूत करू शकत नाहीत, असं चॅलेंज देखील आतिषी यांनी दिलं आहे.

Arvind Kejriwal Narendra Modi
Maharashtra Politics: ठाकरेंचीच शिवसेना असली, खोटे गोटे तुमचा कपाळमोक्ष करतील; संजय राऊतांचं अमित शहांना उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com