

जर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवून घरी निर्धास्त बसत असाल तर आताच उठा. आणि आपल्या मुलांसोबत बोला. कारण त्यांना विद्या देणारे शिक्षक हे कधी किती निष्ठूर होतील हे सांगता येत नाही.
रडून रडून या आईचे अश्रू कोरडे झालेत .वसईतील सातिवलीतल्या श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेमध्ये एका शिक्षिकेनं सहावीत शिकणाऱ्या काजल गौंड नावाच्या विद्यार्थीनीला दिलेली शिक्षा तिच्या जीवावर बेतलीय. शाळेत यायला उशीर झाल्यामुळे शिक्षकीने तिला उठाबशा काढायची शिक्षा दिली. एक दोन नाही तर पाठीवर बँग घेऊन या चिमुरडीनं १०० उठाबशा काढल्यानं तिच्या पाठीत जबरदस्त वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तब्येत अधिक बिघडल्यानं तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
शिक्षिकेच्या क्रूर शिक्षेमुळे मुलीच्या प्रकृतीने उपचारांना साथ दिली नाही आणि राष्ट्रीय बालदिनीच तिनं अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी शाळा आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित होतायेत.
मुळातच मुलांना अशी अघोरी शिक्षा देण्याचे अधिकार शिक्षकांना कोणी दिले. जर शिक्षा दिल्यानंतर मुलांना त्रास होत असेल तर शाळा प्रशासनानं तिच्या पालकांना या शिक्षेबद्दल माहिती का दिली नाही, शाळेतील सीसीटीव्ही फुटेज डिलीट का करण्यात आले.
मुलांना अशी अघोरी शिक्षा देणारी शिक्षिका अद्याप मोकाट का? पोलिस आणि स्थानिक प्रशासन या शाळेवर नेमकी काय कारवाई करणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागून आहे. मात्र एका शिक्षिकेनं केलेल्या एका शिक्षेमुळे एका कुटुंबाचे स्वप्न आणि एका चिमुरडीची आज माती झाली इतकं मात्र खरं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.