Ram Mandir: 'मी बुद्धिस्ट आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांनी...'; राम मंदिर लोकार्पणाच्या निमंत्रणावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

Ramdas Athawale on Ram Mandir invitation: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही श्री राम मंदिर न्यासकडून निमंत्रण दिल्याचं वृत्त आहे. या निमंत्रणावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSaam tv

नितीन पाटकर,पुणे

Ramdas Athawale on Ram Mandir invitation:

श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्यातील काही नेत्यांना निमंत्रण पाठविण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही श्री राम मंदिर न्यासकडून निमंत्रण दिल्याचं वृत्त आहे. या निमंत्रणावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, 'मला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण आलेले नाही. निमंत्रण आले तर मी जाणार आहे. मी बुद्धिस्ट आहे . पण बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती-धर्मांचा आदर करण्याचे सांगितले आहे.

Ramdas Athawale
PM Narendra Modi Interview: भाजप पक्षाचं अस्तित्व फक्त हिंदी पट्ट्यात आहे का? PM नरेंद्र मोदींनी मोजक्या शब्दात दिलं उत्तर

'अनेक गावांमध्ये मला मंदिरामध्ये बोलावतात. आम्ही देखील बुद्ध विहारांमध्ये इतर जाती धर्माच्या लोकांना बोलावतो. राम मंदिर हा भाजपचा विषय नाही, राम मंदिर हा राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर हा धर्मकारणाचा विषय आहे, असेही ते पुढे म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांनी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. यावरही आठवले यांनी भाष्य केलं. 'सिताराम येचुरी कम्युनिस्ट आहेत. कम्युनिस्ट कोणताही धर्म मानत नाहीत. मात्र, सिताराम येचुरी हिंदू आहेत. आता त्यांना निमंत्रण आले आहे, त्यांनी ठरवावं जायचे की नाही. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरून कोणीही राजकारण करू नये. त्यांना निमंत्रण मिळालं , त्यांनी जावं, असं आठवले म्हणाले.

Ramdas Athawale
Loksabha Election 2024: 'राज ठाकरेंनी आदेश दिल्यास निवडणूक लढणार...' वसंत मोरेंनंतर साईनाथ बाबरही पुणे लोकसभेसाठी इच्छुक

मराठा आरक्षणावर आठवले काय म्हणाले?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना आठवले म्हणाले, '⁠तामिळनाडूच्या धर्तीवर मराठ्यांना आरक्षण द्यावे, असे मी सुचवले आहे. ओबीसीची वेगळी कॅटेगिरी करून त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावे. त्यामुळे सध्याचे ओबीसीचे आरक्षण कमी होणार नाही. मराठा आरक्षण म्हणजे सर्व मराठ्यांना आरक्षण नाही, तर ते गरीब मराठ्यांसाठीच आरक्षण आहे.

'जरांगे पाटील यांना मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही. राज्य सरकार त्याआधी मराठा समाजाला आरक्षण देईल. राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे. जरांगे पाटील यांनीही त्यांना वेळ द्यायला हवा, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com