
कल्याण रेल्वे स्टेशन जवळ असलेला सुभाष चौक ते वालधुनी उड्डाण पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे . शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला असून अवजड वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केलं आहे. मात्र याबाबत जनजागृती न झाल्याने आजही बहुतांश अवजड वाहने याच मार्गावर येऊन अडकून पडत आहेत. त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक होतेय.
कल्याण स्टेशन परिसरातून उल्हासनगरकडे जाणारा मुख्य मार्ग आता अवजड वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला कल्याणच्या सुभाष चौक ते वालधुनी उड्डाण पूल दरम्यान होणाऱ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी हा महत्वाचा निर्णय घेतला. यामुळे छोट्या वाहनचालकांना दिलासा मिळाला असून या परिसरातील वाहतूककोंडी देखील मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. या निर्णयामुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला.
मात्र सध्या या हाईट बॅरिगेटची माहिती अनेक अवजड वाहनचालकांपर्यंत न पोहोचल्याने अनेक अवजड वाहने अजूनही या मार्गावर येत आहेत. त्यामुळे बॅरिगेटपाशी ही वाहने अडकून मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ही वाहतूक कोंडी फोडताना पोलिसांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कल्याण स्टेशन परिसरातून उल्हासनगरकडे जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी केल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्याचसोबत याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास देखील कमी होणार आहे. वाहतूक प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्थानिकांकडून स्वागत करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.