Mumbai Dam Water Level: मुंबईवरील पाणीसंकट कधी दूर होणार?, ७ धरणांमधील पाणीसाठा वाढला; पाहा आजची आकडेवारी

Mumbai Water Supply: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. या धरणांमध्ये आतापर्यंत किती पाणीसाठा जमा झाला पाहा आकडेवारी...
Mumbai Dam Water Level: मुंबईवरील पाणीसंकट कधी दूर होणार?, ७ धरणांमधील पाणीसाठा वाढला;  पाहा आजची आकडेवारी
Mumbai Dam Water LevelSaam Tv
Published On

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. कालपासून मुंबईत पावासाचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. या धरणांमधील पाणीसाठ्यात आज मोठी वाढ झाली आहे. धरणामधील पाणीसाठ्यात वाढ होत असल्यामुळे मुंबईमध्ये सध्या असेलली १० टक्के पाणीकपात आता दूर होण्याची शक्यता आहे.

Mumbai Dam Water Level: मुंबईवरील पाणीसंकट कधी दूर होणार?, ७ धरणांमधील पाणीसाठा वाढला;  पाहा आजची आकडेवारी
Mumbai Rain Video: मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला; मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय!

मुंबई महानगर पालिकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ३९.२३ टक्के इतका झाला आहे. १९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ५,६७,७७९ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ३९.२३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ३६.९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

मुंबई शहराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ५ धरण आणि २ तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दररोज ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो. या सातही धरणांमधील पाणीसाठा वाढत असल्यामुळे मुंबईत करण्यात आलेल्या पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये सध्या ५ ते १० टक्के पाणीकपात आहे.

Mumbai Dam Water Level: मुंबईवरील पाणीसंकट कधी दूर होणार?, ७ धरणांमधील पाणीसाठा वाढला;  पाहा आजची आकडेवारी
Mumbai News: मुंबई विमानतळावरून तब्बल ९ कोटींचं सोनं जप्त; कारवाईत ७ जणांना अटक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ८.७५ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - ५७.६६ टक्के पाणीसाठा.

- तानसा - ७४.०१ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ३६.१४ टक्के पाणीसाठा

- भातसा - ३८.०१ टक्के पाणीसाठा.

- विहार - ५९.७७ टक्के पाणीसाठा.

- तुलसी - ८९.३० टक्के पाणीसाठा.

Mumbai Dam Water Level: मुंबईवरील पाणीसंकट कधी दूर होणार?, ७ धरणांमधील पाणीसाठा वाढला;  पाहा आजची आकडेवारी
VIDEO: Mumbai ते Nagpur ७०१ किमीचा प्रवास होणार वेगवान, येत्या सप्टेंबर महिन्यात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com