Child Missing: मुंबईत 36 तासांत 12 मुले बेपत्ता, मानवी तस्करी करणा-या टोळ्या सक्रिय?

Children Missing Across Mumbai : मुंबईतील पालकवर्गाचं टेन्शन वाढवणारी आणि सावध करणारी बातमी आहे. दीड दिवसात तब्बल 12 मुले बेपत्ता झाली आहेत. पाहूया एक रिपोर्ट.
Children Missing Across Mumbai
Mumbai Police on high alert after 12 minors go missing in just 36 hours in Mumbai saam tv
Published On
Summary
  • मुंबईत 36 तासांत 12 अल्पवयीन मुले बेपत्ता.

  • बेपत्ता मुलांमध्ये 8 मुलींचा समावेश.

  • सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रकरणे नोंद.

सतत धावणा-या मुंबईत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याचं मोठं आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. मात्र आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. मुंबईतून गेल्या 36 तासांत 12 अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यामध्ये 8 मुलींचा समावेश आहे.

सात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मुलं बेपत्ता झालीय. यामध्ये शिवाजीनगर परिसरातून सर्वाधिक 4 मुले बेपत्ता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी 'हाय अलर्ट' जारी केलाय. एकाच वेळी इतकी मुले बेपत्ता झाल्यामुळे मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Children Missing Across Mumbai
Shocking: स्वतःच्याच अत्याचाराचा रचला बनाव, विद्यार्थिनीचे कारण ऐकून पोलीसही चक्रावले; बीडमधील धक्कादायक प्रकार

कुठून किती मुले बेपत्ता झाली पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून...

कुठून किती मुले बेपत्ता?

शिवाजी नगर- 4

साकीनाका-2

अँटॉप हिल-2

ओशिवरा-1

मानखुर्द-1

बांगूर नगर-1

Children Missing Across Mumbai
माझी इच्छा पूर्ण कर...! विमा कंपनीच्या अधिकाऱ्याकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी, नागपुरमधील धक्कादायक प्रकार

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. जून ते डिसेंबर 2025 या काळात 145 मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी 93 मुली होत्या. त्यातही 1 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान एकूण 82 जण बेपत्ता झालेत. यामध्ये 41 मुली आणि 13 मुलांचा समावेश आहे.

मुंबई पोलिसांनी बेपत्ता मुलांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवली आहे. बाजारपेठा, सार्वजनिक बागा, रेल्वे स्थानके, बस डेपो, रुग्णालये, बालगृहे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी बेपत्ता मुलांचे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासणी, गस्त आणि तांत्रिक सर्वेक्षण वाढवले आहे. काही मुले वयक्तिक कारणाने घर सोडून पळून गेलेली असतात. अशी मुले काही दिवसांनी घरी परतात, असं पोलिसांचं म्हणणे आहे.

सरकारचा 'ऑपरेशन स्माईल' म्हणजेच 'मुस्कान' ही हरवलेल्या मुलांसाठी शोध मोहीम आहे. मुले हरवण्याचा मुद्दा गंभीर आहे. केवळ मुंबईच नाही देशभरात हा ज्वलंत प्रश्न आहे. अकार्यक्षम यंत्रणेवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी गृह मंत्रालयाअंतर्गत समर्पित पोर्टलची स्थापना करण्याचे सर्वोच्च न्यायालयाची सुचना आहे. 1098 हा हरवलेल्या मुलांसाठी हेल्पलाईन क्रमांक आहे. दरम्यान मुंबईतील घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com