
मुंबई : ही गर्जना आणि हा एल्गार आहे मराठी भाषिकांचा, अमराठी व्यापाऱ्यांनी मीरा भाईंदरमध्येच मराठी भाषिकांना आव्हान देत मराठीविरोधात गरळ ओकली. आणि यानंतर व्यापाऱ्यांच्या मोर्चाला मनसेसह मराठी एकीकरण समितीने मोर्चानेच उत्तर द्यायचं ठरवलं. मात्र इथे सुरु झाला नाट्यमय घडामोडींचा अंक. पोलिसांनी मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारली. तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावत धरपकडही केली. याच मराठीच्या मुस्काटदाबीवरुन मनसे नेते संदीप देशपांडेंनी सरकारवर आगपाखड केलीय. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र मनसेच्या हट्टीपणामुळेच पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं स्पष्टीकरण दिलंय.
सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय जारी केल्यानंतर मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटला. तर हिंदी भाषिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी आगीत तेल टाकत मराठी बोलणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे हा वाद आणखीच टोकाला गेला. तर मिरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याने मराठी भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसेने त्याचा गाल रंगवला. त्यानंतरच्या व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर मोर्चाआधीच पोलिसांनी मराठी भाषिकांची धरपकड केली.
हा मोर्चा मनसेने पुकारला होता. मात्र या मोर्चात मिरा भाईंदरमधील सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे यातून ही गोष्ट स्पष्ट झालीय की मराठी अस्मितेचा मुद्दा हा राजकारणाच्या पलिकडचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.