Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं काठोकाठ भरली, किती टक्के पाणीसाठा?

Mumbai Rain And Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९८ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. प्रत्येक धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा वाचा ताजी आकडेवारी...
Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं काठोकाठ भरली, किती टक्के पाणीसाठा?
Mumbai Dam Water LevelSaam TV
Published On

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं काठोकाठ भरली आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये धरणक्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे ही धरणं काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरासाठीचा पाणीप्रश्न मिटला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये आता ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सातही धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा जमा झाला हे आपण पाहणार आहोत...

मुंबई महानगर पालिकेने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९८ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १४,१९,२७६ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९८.०६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये १३,०८,२०८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच मागच्यावर्षी ९०.३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा ८ टक्क्यांनी वाढला आहे.

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं काठोकाठ भरली, किती टक्के पाणीसाठा?
Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार सुसाट, दोन नव्या मार्गिका तयार होणार; लोकलची संख्याही वाढणार!

मुंबई शहर आणि उपनगराला ७ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांमधून मुंबई शहराला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलावांचा समावेश आहे. या सातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या दोन महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला. आतासुद्धा धरणक्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो. या सातही धरणांमध्ये आता ९८ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आता मुंबईकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ९८.०९ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९९.५८ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ९७.५४ टक्के पाणीसाठा

- भातसा - ९७.४४ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं काठोकाठ भरली, किती टक्के पाणीसाठा?
Navi Mumbai Metro: मेट्रोच्या तिकीट दरात मोठी कपात, नवी मुंबईकरांना दिलासा; जाणून घ्या नवे दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com