

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसांसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बारवी, जांभूळ आणि शहाड जल शुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा कपात करण्यात आल्यामुळे हा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागणार आहे. याच समस्येमुळे ठाणे महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन दिले आहे.
जलसंपदा विभागाच्या निर्णयानुसार एमआयडीसीच्या शहाड येथील जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार, 26 जून 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते रविवार, 28 जून 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजेच सलग 48 तास बंद राहणार आहे. तसेच या कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातील बऱ्याच भागांना पाणीपुरवठा होणार नाही.
तसेच वागळे प्रभाग समितीअंतर्गत रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक 2 आणि नेहरूनगर या भागांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील कोलशेत खालचा गाव येथेही पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.