Maharashtra Politics : भटकती आत्मा तुमचा पिच्छा सोडणार नाही; सत्तेतून खाली खेचणारच, संजय राऊत कडाडले

Sanjay Raut on PM Narendra Modi: जोपर्यंत आम्ही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाच्या पदावरून हटवत नाहीत तोपर्यंत आमचे आत्मे शांत होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भटकती आत्मा तुमचा पिच्छा सोडणार नाही; सत्तेतून खाली खेचणारच, संजय राऊत कडाडले
Sanjay Raut on PM Narendra ModiSaam TV

मयूर राणे, साम टीव्ही मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक दौरे केले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. मोदींच्या या टीकेला शरद पवार यांनी सोमवारी (ता. १०) प्रत्युत्तर दिलं. आत्मा हा कायम राहतो तो कुणाचाही पिच्छा सोडत नाही, असं शरद पवार म्हणाले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केलं.

भटकती आत्मा तुमचा पिच्छा सोडणार नाही; सत्तेतून खाली खेचणारच, संजय राऊत कडाडले
Maharashtra Politics : विनोद तावडे यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळू शकते; चंद्रकात पाटील यांचं सूचक विधान

भटकती आत्मा कुणाचाही पिच्छा सोडत नाही हे शरद पवार यांनी केलेलं विधान बरोबर आहे. जोपर्यंत आम्ही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाच्या पदावरून हटवत नाहीत तोपर्यंत आमचे आत्मे शांत होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, "केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मा आहेत. ज्याप्रकारे मंत्रिमंडळ तयार केलं कॅबिनेट मंत्रीपद दिली खातेवाटप झालं त्यानंतर अनेक अतृप्त आत्मा पाहायला मिळत आहेत. विशेषत: चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन अतृप्त आत्म्यांचे तुम्ही समाधान करा. नरेंद्र मोदी यांना अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागेल".

"भटकती आत्मा कोणाचा पिछा सोडत नाही. जोपर्यंत तुम्हाला सत्तेतून खेचणार नाही तोपर्यंत आमची आत्म अतृप्त राहतील. आमची आत्मा महाराष्ट्रात भटकत राहील" महाविकास आघाडी बाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "महाविकास आघाडी मजबूत राहील आणि मजबूती काय असते हे आम्ही लोकसभा निवडणुकीत दाखवलं".

"विधानसभेतही आम्ही सत्ता बदलून दाखवू. आता एनडीए सरकारमध्ये आम्ही मोदींना प्रश्न विचारणार नाहीत. आम्ही चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना प्रश्न विचारणार. कारण या दोघांचा संयोग सरकार बनवण्यासाठी आहे. त्यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी बनू शकत नव्हते. नरेंद्र मोदी यांची सत्ता ही उधार सत्ता आहे", असा टोलाही राऊतांनी लगावला.

"चंद्रबाबू नायडू वाणी नितेश कुमार यांची मेहरबानी राहील तोपर्यंत ही सत्ता राहील. नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या दरम्यानच स्पष्ट केलं होतं, त्यांना हिंदू मुस्लिम वाद लावायचा आहे. मोदी यांना वाटते की देशातील मुसलमानाने त्यांना मत दिली नाहीत. त्यामुळे त्यांच्या सरकारमध्ये मुस्लिम मंत्री नाही. पण हे संविधानाच्या विरोधात आहे".

"पंतप्रधान सगळ्या जाती धर्माचा असतो. नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांना हे मंजूर आहे का? त्यांनी आपल्या कोट्यातून मुस्लिम मंत्री बनवायला हवा होता. चंद्रबाबू, नितीश कुमार आणि मांझी यांना काय मिळालं? हे सरकार टिकणार नाही. कारण त्यांना मोठे मंत्रिपद मिळाले नाही", असंही राऊत म्हणाले.

भटकती आत्मा तुमचा पिच्छा सोडणार नाही; सत्तेतून खाली खेचणारच, संजय राऊत कडाडले
Baramati Politics: विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु; बारामतीचा 'दादा' बदला, कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com