
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महापालिकेची निवडणूक रंगतदार
भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची ठाकरे गटावर जोरदार टीका
कोव्हिड काळातील निष्क्रियता यावरून साटम यांची टीका
भाजपच्या टीकेला ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार
मुंबई महापालिकेचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ठाकरे बंधू एकत्र येण्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी भाष्य केलं.
अमित साटम म्हणाले, 'महापालिका निवडणुकीत कोण एकत्र आलं, कोण एकत्र आलं नाही, याला महत्व नाही. मुंबईकरांची सेवा कोणी केली. मुंबईकरांना कोस्टल रोड आणि अटल सेतू कोणी दिला. मराठी माणसाला बीडीडी चाळीत घर कोणी दिलं. कोव्हिड काळात जमिनीवर उतरून काम केलं. ऑनलाइन कोण होतं आणि ऑफलाइन कोण होतं.
'उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांनी उतरावं, अशी अजिबात अपेक्षा नव्हती. त्यांचे इतर नेते होते. युवा नेते होते. युवराज होते, ते कुठे होते. कोव्हिड सेंटर स्थापन होत होतं. रिकाम्या सेंटरचा फोटो काढला. सेंटर चालू झाल्यावर एकदाही आले नाहीत. घरात बसणाऱ्या लोकांवर आम्ही बोललो, असं म्हणत ठाकरे गटावर टीका केली.
अमित साटम यांनी कोव्हिड काळात शिवसेनेचे नेते घरात बसून होते, असं म्हणत जोरदार टीका केली. अमित साटम यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावे लागेल.
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नेमकी टीका कोणावर केली?
भाजप नेते अमित साटम यांनी ठाकरे गट आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली. त्यांनी विशेषतः ठाकरे गटाच्या नेत्यांच्या कोव्हिड काळातील निष्क्रियतेवर टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.