Weather Alert : छत्री-रेनकोट घेऊनच बाहेर पडा, महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार

Rain News Today in Maharashtra : आयएमडीच्या अंदाजानुसार, आज कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
छत्री-रेनकोट घेऊनच बाहेर पडा, महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार
weather Alert Heavy Rain of MaharashtraSaam TV
Published On

जून महिन्यात राज्यातील काही भागात पावसाने दडी मारली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून बळीराजा सुखावला आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील ४८ तास राज्यात पावसाची अशी स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

छत्री-रेनकोट घेऊनच बाहेर पडा, महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार
VIDEO : पुराच्या पाण्यात ट्रॅक्टरसह चालक गेला वाहून, थरारक घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद

शुक्रवारपासून मात्र पावसाचा जोर (Maharashtra Weather Update) ओसरण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस उघडीप घेऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, आज कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे दोन्ही जिल्ह्याला रेड अलर्ट (IMD Rain Alert) देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहदनगर तसेच पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पश्चिम घाटत पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते. त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलंय.

आज या भागात पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज बुधवारी नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगड आणि सातारा येथे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस

राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणीसाठा जमा झालाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये ५३.१२ टक्के इतका पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागात सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणीसाठा आहे. तर नाशिक विभागात तो २८.३४ टक्के पाणीसाठा आहे. चिंताजनक बाब म्हणजे, राज्यातील १ हजार २१ गावे आणि २ हजार ५१८ वाड्यांमध्ये अजूनही एक हजार ३६५ टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरू आहे.

छत्री-रेनकोट घेऊनच बाहेर पडा, महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार
Weather Forecast : महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट; हवामान खात्याकडून सतर्कतेच्या सूचना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com