महेंद्र वानखेडे
वसई : नायगावमध्ये वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय मुलगी घरी जाण्यासाठी रिक्षात बसली असता रिक्षाचालकाने या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार १७ डिसेंबरला घडला होता. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून रिक्षाचालकाला अखेर माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वसई परिसरातील नायगावमध्ये वास्तव्यास असलेल्या १६ वर्षांच्या मुलीचा रिक्षाचालकाने विनयभंग केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद नायगावमध्ये उमटले होते. बुधवार १७ डिसेंबर रोजी ती आई बरोबर खरेदीसाठी गेली होती. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ती घरी जाण्यासाठी एकटीच एका रिक्षात बसली होती. मात्र रिक्षाचालक प्रकाश वर्तक याने रिक्षा उमेळमान येथील निर्जनस्थळी नेऊन या मुलीचा विनयभंग केला होता.
अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने संताप
सदरच्या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने कशीबशी आपली सुटका केली आणि पोलीस ठाणे गाठत घडला प्रकार सांगितला. यानंतर माणिकपूर पोलिसांनी सुरवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने नायगावमध्ये संताप पसरला होता. सामाजिक कार्यकर्त्यांना मध्यस्तीनंतर पोलिसांनी रिक्षाचालक प्रकाश वर्तक याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५(१) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अधिनियमाच्या कलम १, १२ अन्यवे गुन्हा दाखल केला होता.
दोन दिवसांची पोलीस कोठडी
मात्र हा रिक्षाचालक घटनेनंतर फरार झाला होता. यानंतर माणिकपूर पोलिसांनी या रिक्षा चालकाला नायगाव परिसरातून सापळा लावून अटक केली. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश वळवी यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.