अक्षय शिंदे, साम टीव्ही जालना
जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे. रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही, म्हणून तीन युवकांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या तरूणांनी अंगावर डिझेल टाकून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जालन्यातील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर ही धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, जालना (Jalna News) जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या गावामध्ये ३२ कुटुंबांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु या तिन युवकांना मात्र रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या तरूणांनी टोकाचं पाऊल उचललं अन् आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.
जालन्यात जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर या तीन तरुणांनी हातात आणलेल्या डिझेलच्या बॉटल डोक्यावर ओतल्या. दरम्यान आजूबाजूच्या काही नागरिकांनी या बॉटल हिसकावून घेत, तरूणांना बाजूला (Ramai Awas Yojana) केलं. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या गावात ३२ जणांना घरकुल योजनेचा लाभ झालाय, मात्र, या तीन जणांना या योजनेत घरकुल मिळाले नाही. म्हणूनच या तरूणांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं समोर आलं आहे. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे.
चार वर्षे झाली, तेव्हापासून अर्ज भरत आहोत. दरवेळी पुढील फेरीत घर मिळेल, असं सांगितलं (Youths Attempted To End Life) जातंय. आम्ही उसतोडी करतो. यावेळी ३२ जणांना लाभ मिळाला आहे. अनेक जणांना दोन-दोन घरं मिळाल्याचं या युवकांनी म्हटलं आहे. आम्हाला गेल्या ४ वर्षापासून फक्त वेगवेगळ्या कार्यालयात अर्ज करण्यास सांगितलं जात ( Jalna Breaking) आहे. आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं या संतप्त युवकांनी म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.